अनुभव
रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४
मराठी भाषा गौरव दिन समारंभ २०२४
बुधवार, ३१ जानेवारी, २०२४
प्रभावी वक्ता : डॉ. दिलीप देशमुख
मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३
दादांना साष्टांग दंडवत !
दादांना साष्टांग दंडवत !
दादासाहेब , तुम्ही अथक प्रयत्नाने सुरू केलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच शाळा , महाविद्यालये उतुंग यशाच्या वाटेवर धावताहेत . त्यासाठी आपल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सर्व आजी - माजी संचालकांचे, निस्वार्थी मुख्याध्यापक , शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान तर आहेच परंतु त्याहीपेक्षा अधिक तुमचे आशीर्वाद आणि शिकवण आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरते आहे. दादासाहेब , तुम्ही नेहमी म्हणायचे - ' कृती पाहिजे , बडबड नको ' ' केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ' ' भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली आणि या भूमीला पावन केले ' ' रंजल्या गांजल्यांची सेवा करा - देव भेटेल ' या , शिका , मोठे व्हा ! ' ' आचाराने आणि विचाराने दरिद्री बनू नका ' अशी कितीतरी सुभाषित सदृश्य वाक्य तुमच्या भाषणांतून आम्ही ऐकली आहेत ; तुमचे विचार काहींनी स्मरणात ठेवलेत पण काही कृतघ्न लोकं तुमची शिकवण विसरून पदाचा माज दाखवण्यात मश्गूल झालीआहेत .
दादा, आज तुमच्या जयंती निमित्ताने तुमच्या प्रतिमांना हार तुरे घालून तुम्हाला अनेकजन प्रामाणिकपणे वंदन करतील .तर काही जन सवयी प्रमाणे पाल्हाडिक लंबी -चौडी भाषणे करतील. त्यात त्यांचे नाटकीपण जास्त असेल. स्वतःला सर्वज्ञ समजणारे , बेगडी वागणारे काही हरमाखोर लोकं तुमची शिकवण विसरून मुजोर वागायला लागली आहेत. पदाचा गैरवापर करत काही नालयकांनी संस्थेतील पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून मुजोर मस्ती केली आहे ; काही अजून तसे करत आहेत. त्यातील अनेकांना नियतीने जबरदस्त फटकारे मारले आहेत. तरीही त्यांच्या कुरापती करणे सुरूच आहे. अशा सडक्या विचारसरणी असलेल्यांना सद्बुद्धी द्या हो दादा !
पदाचा दर्प घेऊन फिरणारी काही स्वार्थी व लबाड माणसं आपल्या संस्थेत घाणेरडे राजकारण करत लोकांना सतवत आहेत . दादा, तुम्ही अशा लोकांबद्दल नेहमी म्हणायचे - ' तळे राखील तो पाणी चाखील ' त्याप्रमाणे काहींनी आपला स्वार्थ साधण्यासाठी तळे खाली करायचा घाट घातला होता पण नियतीने त्यांचाच घात केला आहे. तसा दुर्दैवी घात होण्याआधी स्वार्थासाठी व आपल्या मर्जीतील चमच्यांना पुढे आणण्यासाठी पदाचा गैरवापर करणाऱ्या ढोंगी व संधीसाधू लोकांनी सावध व्हावे , हीच दादांना खरी श्रद्धांजली - आदरांजली ठरेल.
दादासाहेब , तुमचा सहवास आणि आशीर्वाद ज्यांना ज्यांना लाभला ते भाग्यशाली ठरले आहेत . त्यातलाच एक मी आहे . माझ्या पनवेलच्या नवीन घराच्या वास्तुशांती पूजेला ( सन २००० ) आपण पनवेलला बांठीया विद्यालयात आला होतात त्यावेळी मी आपणास घरी येण्याची विनंती केली होती नि तुम्ही तात्काळ मान्य करून माझ्या घरी आलेत. त्यावेळी माझे आई वडीलही आले होते ; तो माझा आनंद तुम्ही द्विगुणित केला . एक ऋषितुल्य पितामह घरी येऊन गेल्याचे अलौकिक सुख- समाधान मी कायम अनुभवतो आहे . एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असल्याचा गर्व किंवा ताठा न बाळगता एका सामान्य शिक्षकाच्या घरी आपण आलात म्हणूनच माझे घर पावन झाले. दादा, तुमचा साधा सरळ स्वभाव , निरपेक्ष वृत्ती , दिलदार मन , संस्थेतील सामान्य कर्मचारी बद्दल आस्था नि आपुलकी इ. गुणांमुळे तुम्ही माझ्यासह अनेकांचे श्रद्धास्थान आहात. पूजनीय आहात.
दादासाहेब , रोज शाळेत आल्यावर तुमचे दर्शन घडते . तो तुमचा अर्धाकृती पुतळा बघून नेहमी वाटतं की तुम्ही माझ्यासह अनेकांच्या पूर्ण आयुष्याचे पाठबळ आहात. तुमचा भरभक्कम , अढळ आशीर्वाद आम्हाला लाभला त्याप्रमाणे सुधागड परिवारात नवीन नियुक्त होणाऱ्या सर्वांना लाभो या अपेक्षेेसह आज आपल्या जयंती निमित्त आपणास साष्टांग दंडवत करतो नि थांबतो .
तुमचा एक निस्वार्थी सेवक -
संजय माधवराव पाटील , पनवेल.
----------------------------------------------------------
सोमवार, २१ डिसेंबर, २०२०
आमचे शिवरामे अप्पा !
शिवरामे सर , अर्थात आमचे अप्पा - काय बोलू तुमच्याबद्दल ? पद आणि प्रतिष्ठेपेक्षा व्यक्ती म्हणून आवडलेला माणूस म्हणजे शिवरामे अप्पा ! खुर्चीच्या गर्व आणि अहंकाराने बरीच माणसे बेताल वागतात किंवा बोलतात पण शिवरामे अप्पा तरी असे वागले - बोललेले मला स्मरणात नाहीत . मी आजपर्यंत अनेक वरिष्ठांच्या हाताखाली काम केले आहे ते सर्व चांगलेच वागलेत व बोललेत ( काही अपवाद वगळता ) ; पण शिवरामे अप्पाच्या वागण्यात आणि बोलण्यात स्नेह आणि आपुलकी जास्त दिसली. माणसं ओळखायची असतील तर निव्वळ भावनेवर न जाता त्यांच्या व्यवहार चातुर्यावर माणसं ओळखा असे ते नेहमी सांगत आलेत. कोणी आपला सहकारी आपली बदनामी करत असेल तर दुर्लक्ष करत जा , जळत्या घरावर रॉकेल शिंपडणारी माणसे जागोजागी असतात अशांना पाणी पाजायचं धोरण ठेवा.......असे कितीतरी मार्गदर्शक तत्वे त्यांनी मला शिकवलीत. म्हणूच मला रागावर नियंत्रण ठेवायला सोपे गेले : नोकरीच्या ठिकाणी काम करतांना आपले सहकारी आपल्याला समजून घेणारे, आपली समजूत घालणारे असले की आपोआप नातं घट्ट विणल जातं तसं माझं आणि शिवरामे अप्पाचे नाते विणले गेले. केवळ आपले वरिष्ठ आहेत , त्यांच्याकडून आपल्याला काही खास सवलत मिळेल या अपेक्षेने मी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचं तोंडदेखले कौतुक किंवा वाहवा केली नाही आणि करणार पण नाही पण शिवरामे अप्पाबद्दल जे मी आज लिहितोय ते सर्वस्वी माझे अंतर्मनातील बोल आहेत. निव्वळ एक नोकर म्हणून समोरच्याला कोणी वागवलं तर तो ही निव्वळ चाकर म्हणून काम करतो : त्यात आस्था असत नाही ; अध्यापनाचे किंवा शाळेतील कोणतेही काम करतांना वरिष्ठांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण सगळेजन धावपळ करतो अशावेळी कोणी जर आपल्या कामात उणिवा काढून वरिष्ठांचे कान भरत असेल तर त्याचाही राग अनावर होतो पण अशावेळी संयम कसा ठेवावा हेही शिवरामे अप्पांच्या मार्गदर्शनातून मी शिकलो. कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा असे असे कोणी वागू नये असे शिवरामे सर नेहमी सांगत आलेत आणि म्हणूनच त्यांच्या प्रेरणेने समर्पण भावना अनेकांनी घेत आपल्या शाळेसाठी वेळ आणि श्रम वेचले आहेत. आपल्या कर्तव्याबद्दलची आस्था शिवरामे सरांमुळे मला बाळगता आली. जशास तसे उत्तर देणे हा माझा मूळ स्वभाव असला तरी कशालाही का भिडयाचे ही सूचना ते मला कायम देत होते.
नियत वयोमानानुसार श्री शिवरामे सर सेवानिवृत्त होत आहेत - आज दि 21 डिसेंबर 2020 रोजी त्यांचा सेवापूर्ती समारंभ के .आ. बांठिया माध्यमिक व एन.एन. पालीवाला ज्यु. कॉलेज , नवीन पनवेल येथील सभागृहात आयोजित केला आहे . या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी मी निघालो होतो पण प्रवासाचे साधन उपलब्ध न झाल्याने रात्री 10 वाजता पारोळा येथून मला परत यावे लागले याची मला खंत आहे . श्री शिवरामे सरांनी माझ्या नोकरीच्या गेल्या २४ वर्षात मला जो स्नेह दिला , सहकार्य केले व अफलातून मैत्रीचे नाते जपले त्याचा अभिमान मी कायम लक्षात ठेवेल ! श्री शिवरामे सरांचे सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे - समाधानाचे - निरोगी - दीर्घायुषी जावो या सदिच्छेसह मी माझ्या भावनांना विराम देतो ! धन्यवाद ! ---------- संजय पाटील -----------
शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४
आदर्श गुरुः श्रीमती निंबाळकर म्यडम
रविवार, १ जून, २०१४
मेहनती -रोडगे सर !
संग्राम शिवाजी रोडगे हे १९८२ पासून बांठिया विद्यालय पनवेल येथे कार्यरत आहेत .३१ मे २०१४ रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिव्रत्त होत आहेत , पण ३१ मे ला उन्हाळी सुट्टी असल्याने दि. २९ एप्रिलला शाळेकडून त्यांना निरोप दिला गेला व ३० एप्रिल ला सायंकाळी ६ ते १० या वेळेत विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी रोडगे सरांवरील प्रेमापोटी दिमाखदार सेवापूर्ती समारंभ आयोजित केला होता. या समारंभासाठी पनवेलचे विद्यमान आमदार श्री प्रशांत ठाकूर ,पनचवेलचे माजी नगराध्यक्ष श्री संदिप पाटील, जि.प.सदस्य श्री राजेंद्र पाटील, विद्यालयाचे भूतपूर्व मुख्याध्यापक श्री सुतार सर, विद्यमान मुख्याध्यापक श्री पवार सर, पनवेलचे मीडिया प्रतिनिधी, अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांसह अनेक आजी-माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्री रोडगे सरांबद्दल गौरोद्गार काढलेत. सर्व वक्त्त्यांच्या भाषणांतून रोडगे सरांच्या ३२ वर्षाच्या सेवेतील आठवणी सांगताना एक मुद्दा समान दिसला व तो म्हणजे रोडगे सरांची शिस्त ,कामावरील निष्ठा. मी १९९६ पासून रोडगे सरांना पाहतो आहे . शाळेच्या प्रत्येक मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी रोडगे सरांच्या वक्तशीरपणाबद्दल व अविश्रांत परिश्रमाबद्दल कबुली दिलेली आहे . त्यांच्या मित्रांनी त्यांचं कौतुक करणं स्वाभाविक आहे पण त्यांचे विरोधकही त्यांच्या वरील गुणांचं कौतुक करतांना मी अनुभवले आहे . अशी माणसं समाजासाठी आदर्श ठरतात .रात्र शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत म्हणजे तब्बल १४ वर्ष विनाअनुदानित रात्र शाळा चालवतांना अनेक अडचणी आल्या असतील, अनेकांशी त्यांचे मतभेदही झाले असतील तरी ते कधीही कोणावरही खूप भडकले किंवा अद्वातद्वा बोलले असं कधीही दिसलं नाही. पराकोटीचा संयम काय असतो तो त्यांच्या वागण्या- बोलण्यातून जाणवला. एस.एन.डी.टी चे दूरस्थ अभ्यासकेंद्र सुरु करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. केंद्राला मान्यता मिळवण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता, तत्कालीन मुख्याध्यापक श्री मोकल सरांनी, जोशी सरांनी संस्थेकडे हा प्रस्ताव पाठवला होता पण संस्थेने विहित वेळेत प्रस्तावावर निर्णय न घेतल्याने मी रोडगे सरांना त्याबाबत सांगितले. व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक ला प्रस्ताव पाठवण्याबाबत बोललो. रोडगे सरांचे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेबांचे संबंध खूप सलोख्याचे असल्याने रोडगे सरांना अडचणी आल्या नाहीत व मुक्त विद्यापीठाचे केंद्र बांठिया विद्यालयात सुरु झाले . या ही प्रसंगातून एक लक्षात आलं की रोडगे सर अखंड पाठपुरावा करणारे आहेत . संस्था, सर्व मुख्याध्यापक यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असल्याने बहुसंख्य कामे होतात याचाही प्रत्यय आला .हे केंद्र चालवतांना दिवसरात्र मेहनत घेऊन रोडगे सरांनी केंद्राचा पर्यायाने संस्था व शाळेचा लौकिक वाढवला आहे . अनेक अल्पशिक्षितांना पदवी व पदव्युत्तर शिक्षण या केंद्रामुळे घेता आले आहे , ही परंपरा कायम टिकावी व रोडगे सरांच्या परिश्रमाचे चीज व्हावे ही अपेक्षा आहे .
निव्रुत्ती नंतर त्यांच्या कामाचा व्याप कमी होवो व सुखी, समाधानी , आरोग्यदायी दीर्धायुष्य त्यांना लाभो या सदिच्छेसह थांबतो .
.....................................................
संजय पाटील, पनवेल.
गुरुवार, ८ मे, २०१४
आजोबा
शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४
निवडणूक ड्युटी
बुधवार, ९ एप्रिल, २०१४
एकेकाचे स्वभाव
शुक्रवार, १४ मार्च, २०१४
चोर
सकाळी ११ वाजता खांदेश्वर पोलीस स्टेशनला गेलो . तिथे सूर्यवंशी नावाचे ड्युटी ऑफिसर भेटले , त्यांनी संद्याकाळी ६ नंतर येण्याबाबत सांगितले . पुन्हा मढवी सरांना घेऊन ६ वाजता पोलीस स्टेशनला गेलो . पण चोरासंबंधी माहिती असलेला अधिकारी रात्री ९ वाजता येतील , असे समजले परत यायला निघालो पण सूर्यवंशी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन केल्याने ते थोड्या वेळात पोलीस स्टेशनला येतील म्हणून थांबलो . अर्ध्या तासात ते आले .सतीश पवार साहेबांना भेटून चोरीच्या उद्देशाने माझ्या गाडीची काच फोडल्याबाबत ची तक्रार मी नोंदवली तेव्हा समजले कि त्या चोराने त्या रात्री दोन दुकाने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता , शिवाय त्याच्या कडे लोखंडी हत्यारे सापडली होती .