गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

संपादकीय 'तरंग २०१४'

बांठीया माध्यमिक व पालीवाला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त 'तरंग'  हे विद्यार्थ्यांचे  हस्तलिखित आपल्या हाती देतांना अतिशय आंनंद होत आहे. 
   विद्यालयाचे प्राचार्य श्री पवार सरांच्या कल्पकतेतून हस्तलिखिताची संकल्पना पुढे आली. व  आपल्या विद्यालयातील सर्व विभागातील सर्व शिक्षकांनी 'तरंग' करिता विद्यार्थ्यांना लिहिण्याची प्रेरणा दिली म्हणूनच  या हस्तलिखिताला  मूर्तरुप देता  आलं ; याची आम्हाला जाणीव आहे. विद्यार्थ्यांकडून साहित्य येत असतांना नेमकं कोणतं साहित्य घ्यावे नि कोणतं नको अशा द्विधा मनस्थितीत संपादक मंडळाचे सदस्य होते, पण हस्तलिखित समिती प्रमुख  श्रीमती निंबाळकर म्याडम व समितीचे सर्व सदस्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून आलेल्या साहित्याची वर्गवारी करून दिली; शिवाय शुद्धलेखन तपासून दिल्यामुळे संपादक मंडळाचे काम सोपे झाले.
   कथा , कविता , लेख , विनोद , सुविचार इ. प्रकारचे साहित्यिक लेखन ५ वी ते १२ वी च्या दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांनी केलेले आहे. या लिखाणात विद्यार्थ्यांमधील प्रतिभा,सर्जनशीलता, कल्पकता इ. साहित्यिक गुणांना वाव देता यावा ; विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळावी, स्नेहसंमेलन निमित्य साहित्यिक स्नेह वाढीला लागावा, भाव तरंगांचे आदान प्रदान व्हावे  या हेतूने हे हस्तलिखित तयार करण्यात आले आहे. 
   यातील काही त्रुटी असल्यास त्या आमच्या पदरात घालाव्यात व चांगलं असेल त्याचे मुक्तकंठाने कौतुक व्हावे या अपेक्षेसह धन्यवाद !
...............................................................................................................................
                                                               संपादक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा