जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेले आजचे दोन उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने रायगड जिल्हा परिषदेच्या चिंचपाडा केंद्रशाळेत संपन्न झाले.
*उपक्रम १*
जलसाक्षरता अर्थात पाण्याचे योग्य नियोजन या विषयावरील चित्रकला स्पर्धेत ४२ मुलानी भाग घेतला. स्पर्धा सुरू होण्याआधी या विद्यार्थ्यांना विषय समजावून देण्यात आला. तसेच स्पर्धेचे परिक्षक म्हणून पनवेल नामवंत चित्रकार श्री उत्तम घोष हे उपस्थित होते. त्यांनीही मुलांना स्पर्धेआधी विशेष मार्गदर्शन केले. आजचे परिक्षक हे
Sir J. J. Institute of Applied Art, Mumbai मधील Applied Art graduate असून ते
Visual Artist आहेत. अनेक नामवंत कला प्रदर्शनात त्यांचा सहभाग आहे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कला उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. या क्षेत्रात त्यांनी खूप पारितोषिके प्राप्त केली आहेत. (जाणीवचे आजीव सदस्य श्री खेडेकर यांच्या कन्येच्या माध्यमातून हे परिक्षक आपल्यासाठी उपलब्ध झाले होते)
*उपक्रम २*
खेळता खेळता पर्यावरण आणि पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, त्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने साप शिडीच्या धर्तीवर एक खेळ आपण तयार केला आहे. शाळेतील ३० मुले या खेळात सहभागी झाली. त्यांचे दोन गट करून हा खेळ घेण्यात आला.
या खेळातून मुलांना पर्यावरण रक्षणाची आणि पाणी बचतीची सवय होईल, किमान ही मुले त्यावर विचार करतील आणि सक्षम नागरिक होण्याचा प्रयत्न करतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. या खेळात दोन्ही गटांतील मुलानी अतिशय उत्साहाने भाग घेतला, खेळाच्या शेवटी काय शिकता आले याबाबत चार विद्यार्थी यांनी आपापली प्रतिक्रियाही दिली. शाळेच्या शिक्षक वर्गासाठी हा आपला अनोखा उपक्रम आवडला.
दोन्ही उपक्रम झाल्यावर एका छोटेखानी बक्षिस समारंभात चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. विज्ञान दिनाच्या कार्यक्रमातील आठ उत्तेजनार्थ बक्षिसेही आजच्या कार्यक्रमात देण्यात आली.
चित्रकला स्पर्धेचे परिक्षक श्री उत्तम घोष सर यांनी विद्यार्थ्यांना चित्र काढण्याच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन केले.
जाणीव आणि रोटरी मार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चिंचपाडा केंद्र शाळेत विविध उपक्रम आयोजित करीत असल्याबद्दल केंद्रप्रमुख ठाकूर सर, केंद्रशाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाने धन्यवाद दिले आणि असेच विविध उपक्रमांचे आयोजन यापुढेही शाळेत करावे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आजचे दोन्ही उपक्रम संपन्न झाले.
(काही क्षणचित्रे फोटोंच्या स्वरूपात पाठवित आहे)