शुक्रवार, १४ मार्च, २०१४

चोर

आज पहाटे (१४ मार्च २०१४) १:३० वाजता काहीतरी ठोकल्याचा आवाज आला . मी मोबाईल  नेटवरुन पुस्तक डाऊनलोड करत असल्याने जागा होतो. आवाजामुळे माझ्या पत्नीलाही जाग आली. तिने हळूच बेडरुमची खिडकी उघडून कानोसा घेतला : आमच्या अल्टो गाडीच्या ड्रायव्हर विंडोची काच फोडली जात असल्याचे तिने पाहिले व मला बोलावले. मी  त्या  चोराला  सनसनीत शिवी हासडली  व तेथेच थांबायला सांगितले पण त्याने हातातला दगड फेकून पळ काढला . एव्हाना माझी  मुले जागी झाली होती. मी तात्काळ खान्देश्वर पोलीस स्टेशनला फोन केला व गाडीजवळ गेलो. गाडीची काच अर्धवट फोडलेली दिसली . तेवढ्यात पोलीस आले : त्यांनी चोराचे वर्णन विचारले व निघून गेले  . शेजारचे गुप्ता आले होते त्यांना घेऊन मी चोराला शोधायला बाईक घेऊन निघालो . सेक्टर ११ चे गार्डन , आतल्या गल्ल्या बघून आम्ही सेक्टर ९ पर्यत पोहचलो आणि स्वप्नील ने (माझा मोठा मुलगा ) मला फोन करुन कळविले की "पोलिसांनी चोराला पकडून आपल्या बिल्डींग जवळ आणले आहे , लवकर या !" मी व गुप्ता परत आलो . काच फोडणारा तो चोर अवध्या १५ ते २० मिनिटात पोलिसांनी डी .ए.व्ही. शाळेजवळून पकडला होता. चोराने गाडीची काच फोडल्याने मी  रागातच होतो. आल्याबरोबर त्या चोराच्या कानाखाली आवाज काढला  नि मग बोललो . चोराने पोलिसांना व मला तो शाव असल्याबाबत सांगायला सुरवात केली . पण त्याचं सगळं थोतांड पोलिसांनी ओळखलं आणि त्यांच्या बाईकवर बसवून चोराला पकडून नेलं .
  सकाळी ११ वाजता खांदेश्वर पोलीस स्टेशनला गेलो . तिथे सूर्यवंशी नावाचे ड्युटी ऑफिसर भेटले , त्यांनी संद्याकाळी ६ नंतर येण्याबाबत सांगितले . पुन्हा मढवी सरांना घेऊन ६ वाजता पोलीस स्टेशनला गेलो . पण चोरासंबंधी माहिती असलेला अधिकारी रात्री ९ वाजता येतील , असे समजले परत यायला निघालो पण सूर्यवंशी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन केल्याने ते थोड्या वेळात पोलीस स्टेशनला येतील म्हणून थांबलो . अर्ध्या तासात ते आले .सतीश पवार  साहेबांना भेटून चोरीच्या उद्देशाने माझ्या गाडीची काच फोडल्याबाबत ची तक्रार मी नोंदवली तेव्हा समजले कि त्या चोराने त्या रात्री दोन दुकाने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता , शिवाय त्याच्या कडे लोखंडी हत्यारे सापडली होती .
अवघ्या २० / २२ वर्षाच्या त्या तरुणाकडे ( चोराकडे ) बघून खूप वाईट वाटले . तो कोठेही काहीही कामधंदा करत नाही , पोटासाठी  उमेदीच्या वयात त्याला चोरी - मारी करावी लागते, तो व्यसनी असल्याचे व  घरातील व्यक्ती त्याला कंटाळली आसल्याचे पोलिसांनी सांगितले. आजचे बरेच तरुण वाट चुकत असल्याचे  ऐकून माहित होते , त्याची खात्री पटली. कोर्ट कचेरीची कटकट नको म्हणून पोलीसांनी  त्याच्यावरील गुन्हा रजिस्टर करू नका म्हणून मला सांगितले . शिवाय मढवी सरांना त्या चोराची दया आली ; सर म्हणाले, त्याला पोलीसांनी खूप मारले आहे, अजून त्याला त्रास द्यायला नको म्हणून मी त्याच्यावरील केस मागे घेण्याचा सल्ला सरांनी मला दिला. त्याला रात्रभर पोलीस मारतील म्हणून त्याला सोडायला सांगितले. त्याला सुधारायची संधी देऊ या असे आम्ही दोघांनी 
( मढवी सर व  मी ) ठरवले नि घरी आलोत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा